Saturday, August 21, 2021

षष्टी हवनकार्य निमित्त परमात्मा एक स्टेट्स | परमात्मा एक फुल स्क्रिन स्टेट्स नक्की बघा.

  

Parmatma Ek WhatsApp Status


  ( २८ ऑगस्ट २०२१ एका भगवंताचे षष्टी हवनकार्य लवकरच स्टेट्स )


सेवकांकरिता नवनवीन व्हाट्स ॲप स्टेट्स बघण्यासाठी आपल्या या युट्यूब चैनल वर भेट देऊन YouTube Channel ला Subscribe नक्की करा.


स्टेट्स बघण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघावे.

युटयुब लिंक:- https://youtube.com/shorts/kKjv3H-QWzI?feature=share





🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎


सौजन्य:-        ★सेवक एकता परिवार★
             ( Social Media Platform )

©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )

सेवक एकता परिवार ( Facebook Page )


©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
सेवक एकता परिवार ( Blog Spot )

©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
सेवक एकता परिवार ( YouTube Channel )

©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
सेवक एकता परिवार ( Instagram )



Friday, August 20, 2021

२८ ऑगस्ट २०२१ षष्टी हवनकार्य लवकरच | परमात्मा एक फुल स्क्रिन स्टेट्स नक्की बघा.

 

Parmatma Ek WhatsApp Status


  ( २८ ऑगस्ट २०२१ एका भगवंताचे षष्टी हवनकार्य लवकरच स्टेट्स )


सेवकांकरिता नवनवीन व्हाट्स ॲप स्टेट्स बघण्यासाठी आपल्या या युट्यूब चैनल वर भेट देऊन YouTube Channel ला Subscribe नक्की करा.


स्टेट्स बघण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघावे.

युटयुब लिंक:- https://youtube.com/shorts/IgSntPbQWfk?feature=share




🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎


सौजन्य:-        ★सेवक एकता परिवार★
             ( Social Media Platform )

©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )

सेवक एकता परिवार ( Facebook Page )


©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
सेवक एकता परिवार ( Blog Spot )

©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
सेवक एकता परिवार ( YouTube Channel )

©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
सेवक एकता परिवार ( Instagram )



Thursday, August 19, 2021

परमात्मा एक स्टेट्स | षष्टी हवनकार्य लवकरच परमात्मा एक फुल स्क्रिन स्टेट्स नक्की बघा.

 


Parmatma Ek WhatsApp Status


  ( २८ ऑगस्ट २०२१ एका भगवंताचे षष्टी हवनकार्य लवकरच स्टेट्स )


सेवकांकरिता नवनवीन व्हाट्स ॲप स्टेट्स बघण्यासाठी आपल्या या युट्यूब चैनल वर भेट देऊन YouTube Channel ला Subscribe नक्की करा.


स्टेट्स बघण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघावे.

युटयुब लिंक:-https://youtube.com/shorts/25Ke8J-fVGI?feature=share 






🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎


सौजन्य:-        ★सेवक एकता परिवार★
             ( Social Media Platform )

©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )

सेवक एकता परिवार ( Facebook Page )


©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
सेवक एकता परिवार ( Blog Spot )

©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
सेवक एकता परिवार ( YouTube Channel )

©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
सेवक एकता परिवार ( Instagram )



Saturday, July 31, 2021

३१ जुलै "मातोश्री वाराणसी आई जुमदेवजी ठुब्रीकर" यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख

 मातोश्री वाराणसी आई यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख



( मातोश्री वाराणसी आई यांच्या 31 जुलै पुण्यतिथी दिनानिमित्त विशेष लेख )


       महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानवाच्या हितासाठी, सुख-समाधानी साठी एक भगवंताची प्राप्ती करून मानवधर्म स्थापन केले आहे. या मानव धर्माचे आपण सेवक आहोत म्हणून आपल्याला बाबांनी केलेल्या भगवत् प्राप्तीच्या कार्यात बाबांना प्रत्येकदा सहकार्य, सहयोग करणाऱ्यांची आपल्याला माहिती असणे तसेच त्यांना जाणून घेणे अत्यावश्यक आहे.


       आपले महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या अर्धांगिनी - धर्मपत्नी म्हणजे आमच्या सर्वांच्या मातोश्री वाराणशी आई ठुब्रीकर यांनी बाबांना पदोपदी, प्रत्येक वेळी, कठीण समयी परीपूर्ण साथ दिली आहे. बाबांना आईची साथ मिळाली नसती तर बाबांनी प्रपंचातून परमेश्वर साधला नसता.


       सतयुगात जसे ब्रम्हा-सरस्वती, विष्णु-लक्ष्मी, शिव-पार्वती इत्यादि , त्रेतायुगात राम-सिता आणि द्वापारयुगात पाचपांडव-द्रोपदी. तसेच कलयुगात बाबा जुमदेवजी-आई वाराणशी.


       अधर्मीयांचे नाश करून धर्म रक्षणासाठी सतयुगात दानवांचे- राक्षसी प्रवृत्तीच्या दैत्याचा नाईनाट करण्यासाठी ब्रम्हा, विष्णु, महेश यांना त्यांच्या पत्नी - अर्धांगिनीने वेगवे रूपात सहकार्य केले, त्रेतायुगात रामाला अधर्मी, अन्यायी, अत्याचारी रावणाचा वध करण्यासाठी सितेच्या सहकार्याने एक निमित्त मिळाले आणि रावणाचा वध करावे लागले. द्वापारयुगात द्रौपदीच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे निमित्त बनून सहकार्याने धर्म संस्थापनाचे कार्य करण्यासाठी श्रीकृष्णाच्या उपदेशाने अधर्मीयांना व त्यांना सहयोग करणाऱ्यांना युद्धात मारावे लागले. जेणेकरून धर्म टिकून राहायला पाहिजे.


       युगानुयुगे धर्म स्थापन करण्यासाठी भगवंताला मानवाची गरज होती म्हणून मानव रूपात भगवंतानी जन्म घेऊनच मानवाला धर्म-कर्माची शिकवण देण्यासाठी निती-नियम बनवून स्वतः आचरणाने जीवन जगण्याचा ज्ञान देण्याचे कार्य भगवंतानी मानव जन्म घेऊन केलेले आहे.


       या कलयुगात सुद्धा अधर्मी आचार - विचारानुसार कर्मभोगी मानवात धर्मांधता वाढत चालली असतांना अधर्मी, दुष्कर्मी, दुराचारी, व्यभिचारी, अन्यायी, अत्याचारी प्रवृत्ती जगात थैमान घालत आहे त्यामुळे धर्म नाहिसा होणार आणि संपूर्ण सृष्टिवर संकट निर्माण होईल असे भगवंताला वाटले असावे म्हणून भगवंतानी महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या रूपाने आम्हाला मानवधर्माची शिकवण दिली आहे.


       श्रृष्टि मधे भगवंताने प्रत्येकाची जोडी बनविलेली आहे कारण कोणतेही कार्य, व्यवहार एकट्याने अशक्य आहे. म्हणूनच बाबांच्या अर्धांगिनी, आमच्या मातोश्री वाराणशी आईंनी बाबांच्या परमेश्वरी कृपा संपादन करण्याच्या कार्यात, बाबांच्या निराकार अवस्थेत तसेच विदेहावस्थेत सहयोग केले, बाबांना आईचे परीपूर्ण सहकार्य मिळाले, म्हणूनच बाबा एका भगवंताची प्राप्ती करण्यात यशस्वी झाले.


       बाबांना आईंची पदोपदी, वेळोवेळी बाबांच्या खांद्याला खांदा लावून यथोचित साथ मिळाली नसती तर एक भगवंताच्या प्राप्तीनंतर बाबा संन्यासी जीवन जगत राहिले असते आणि आम्हाला आमच्या धर्माचे, भगवत् कृपेचे, सुख-समाधानी जीवन जगण्याचे ज्ञान बाबांच्या आदेश, संदेश, उपदेशा द्वारे कधीही मिळाले नसते. यावरून आमच्यासाठी मातोश्री वाराणसी आईंनी बाबांना सेवकाला प्रपंचातून परमेश्वरी कृपेचा लाभ मिळण्यासाठी निराकार आणि विदेहावस्थेतून मुक्त करण्याचे महान कार्य केलेले आहे.


        मातोश्री एव्हढ्यावरच थांबल्या नाहीत तर जेंव्हा महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना भगवंतानी त्यांचे आयुष्य संपण्याची जाणीव करून दिले तेंव्हा आईंनी जगातील कोणत्याही धर्मात नाही असा हा मानव धर्म आहे हे सिद्ध करून देण्यासाठी तसेच सेवकांच्या हितार्थ मानवधर्माची शिकवण अधिक काळ सेवक सेविकांना मिळायला पाहिजे म्हणून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुमारे 15 वर्षाचे आपले आयुष्य बाबांना देण्याचे अविस्मरणीय त्यागाचे न भूतों न भविष्यती असे कार्य करून आपले त्यागमय जीवन सार्थकी केलेले आहे.


       मातोश्री वाराणसी आई जुमदेवजी ठुब्रीकर यांनी आमच्यासाठी बाबांच्या सोबतीने केलेल्या त्यागासाठी आणि मानवाला भगवंता प्रती जागविण्याचे हितार्थ कार्यासाठी बाबांना निराकार आणि विदेहावस्थेतून मुक्त करण्याचे आणि आमच्यासाठी आपले आयुष्य बाबांना प्रदान करण्याचे महान कार्य केल्याबद्दल हार्दिक अभिनंदनासह आदरांजली अर्पण करून आपले विचार थांबवित आहे.


माझ्या लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.


नमस्कार....!


✍🏻लेखन :- संतोष बोपचे

                सुर्यटोला, गोंदिया


( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )


सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार 


                   ( Social Media Platform)


🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎


                  ★ सेवक एकता परिवार ★

             ( Social Media Platform )


©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )

https://www.facebook.com/SevakEktaParivar/


©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )

https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1


©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )

https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q


©️ सेवक एकता परिवार ( Instagram )

https://www.instagram.com/sevak_ekta_parivar

Thursday, April 1, 2021

३ एप्रिल "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांच्या जयंतीनिमित्त विशेष लेख नक्की वाचा

 




"महानत्यागी बाबा जुमदेवजी" 

यांच्या जयंती निमित्त विशेष लेख..


           !! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!

        !! महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !!

                         !! परमात्मा एक !!


           भारतीय संस्कृतीमध्ये मानवाला परमेश्वराबद्दल जागविण्याकरिता अनेक महापरूषांनी जन्म घेतला. ही सृष्टी सदोदित सत्य मानवाची राहावी म्हणून परमेश्वराने कालचक्र निर्माण केले. या कालचक्रात सत्ययुग, द्वापार युग, त्रेतायुग आणि कलीयुग अशी चार युगांची रचना केली. या सर्व युगामध्ये जेव्हा जेव्हा अराजकता, अनिती, अनैतिकता, असत्य, दुराचार, अत्याचार, भ्रष्टाचार, स्वार्थीपणा, मोह, माया, अहंकार या वृत्ती मानवांत भयंकर प्रमाणात वाढु लागल्या तेव्हा तेव्हा परमेश्वराने या गोष्टीचा नायनाट करण्याकरिता मानवाच्या रूपात जन्म घेतला आणि त्या गोष्टीबद्दल मानवांत जागृती निर्माण करून त्याचा नाश केला. इतकेच नव्हे तर मानवाला परमेश्वरी गुणांबद्दल जागविले आणि मानवाला मोक्ष कसा मिळेल याबद्दल त्यांनी शिकवण दिली. थोडक्यात आध्यात्मिक शक्ती, नीती, सत्य, आत्माच्या दृष्टीने अवलंबिले. धर्मनीती हीच खरी परमेश्वरी कृपा आहे हे शिकविण्याचे कार्य या महापुरूषांकडून घडविले. अशाप्रकारे प्रत्येक युगात कालपरत्वे सत्यनिती टिकविण्यासाठी परमेश्वराचा अंश म्हणून महापुरूषांच्या रूपात परमेश्वराचा जन्म झालेला आहे.


       अशा एका निष्काम कार्य करण्याऱ्या कर्मयोगी महान त्यागी बाबा जुमदेवजी महापुरूषाचा महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर शहरातील गोळीबार चौक जवळील टिमकी या परिसरात  वास्तव्यास असलेल्या श्री. विठोबाजी राखडू ठुब्रिकर आणि सौ.सरस्वतीबाई या दांपत्याच्या पोटी ३ एप्रिल १९२१ रोजी जन्माला आले.


     त्यांनी २५ ऑगष्ट १९४८ सृष्टीनिर्मात्या एका भगवंताची प्राप्ती केली आणि त्या परमेश्वरी कृपेचा परीचय समाजातील सर्व दुःखी कष्टी, गोरगरीब, जनतेला विनामुल्य करून दिला. त्यांनी परमेश्वराची ओळख करून देताना सांगितले कि, परमेश्वर हा एकच आहे व तो प्रत्येकात विराजमान आहे. तो निराकार आहे. ती व्यक्ती नसून जागृत शक्ती आहे. तो मानवता चोविस तास चैतन्य आहे. ती निर्जिव वस्तुमध्ये नसून सजीव प्राण्यांच्या आत्मात आहे. परमेश्वर दिसत नसून त्याचे गुण दिसतात. मानवाने परमेश्वराला प्रिय असणारे सत्य, मर्यादा, प्रेमाचे आचरण करावे, त्यागाने कार्य घडवावे म्हणजे खरा मोक्ष मिळतो. "मानवाने मानवासारखे वागावे, सत्य यही भगवान है" ही शिकवण त्यांनी दिली. अशाप्रकारे मानवाला परमेश्वराबद्दल जागविण्याकरिता त्यांनी १९४९ साली फेब्रुवारी महिन्यात "मानव धर्माची' स्थापना केली.


       परमेश्वराला हव्या असलेल्या सत्य, मर्यादा, आणि प्रेमपूर्ण वागणूक यासाठी मानवाला कार्य करायचे आहेत, मर्यादित कुटुंब, वाईट व्यसनमुक्ती, शुध्द मन, स्वच्छ कपडे, साधी राहणी, उदात्त विचार आणि त्यागमय जीवन इ. गोष्टी या मानव धर्माची शिकवण आहे.


या मानव धर्माची स्थापना केल्यानंतर महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी दुःखी कष्टी मानवाला एका भगवंताचा परिचय करून देण्याकरिता खेडोपाडी, बैलगाडीने, पाई दौरा करून कशाचीही पर्वा न करता मानवजागृतीचे कार्य निष्काम भावनेने केले. बाबांनी भगवत प्राप्ती करिता निष्काम कर्म योग साधण्याकरिता बाबांनी चार तत्व दिले व आपली घरगृहस्थी उंच आणण्याकरिता पाच नियम दिले व सेवकात व कुटूंबात एकता कायम राहावी याकरिता तीन शब्द दिले. या चार तत्व, तीन शब्द व पाच नियमाचा आधारावर मार्गात येणारा सेवक आपले जिवन सुखमय जगु शकतो. बाबांनी सृष्टी निर्मात्या एका परमेश्वराची कृपा संपादन करून सुध्दा कधीही कोणालाही आपल्या पाया पडू दिले नाही किंवा कोणाकडून एक पैसा किंवा कुठलीही भेटवस्तु स्विकारली नाही तर त्यांनी निष्काम भावनेने लोकांची सेवा केली. कारण 'मानवाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा' असे त्यांचे मानने होते. बाबांनी प्राणातप्राण असेपर्यन्त सत्य, मर्यादा प्रेमाचे आचरण करून तिच शिक्षा आपल्या सेवकांना दिली.


     महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी केलेल्या महान कार्याचीद खल घेवून भारत सरकारने त्यांच्या नावे दि. ३०/९/२०१३ ला 'टपाल खात्याचे टिकीट' काढून त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी स्थापन केलेल्या 'परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूर' ला महाराष्ट्र शासनातर्फे 'महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार' बहाल करण्यात आला.


    अशा प्रकारे निष्काम कर्मयोगी महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी दु:खी कष्टी गोर-गरिब मानवाला जगविण्याचे एका भगवंताच्या मानवाला परिचय करून देण्याचे कार्य सुरू केले होते. तेच कार्य बाबांनी मानव धर्माचे प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने ४ डिसेंबर १९६९ ला परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळाची स्थापना केली. मंडळाचे कार्य अहोरात्र सुरू असून बाबांचा संदेश, उपदेश दुःखी, कष्टी व गोरगरीब जनतेपर्यनत पोहचवून त्यांना सत्याप्रती जागवून महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी सुरू केलेल्या सत्ययुगाचा रथ पुढे नेत आहेत.


अशा या कलियुगात सत्याचे बीज पेरणारे, सत्य मर्यादा प्रेमाचे जनक, मानवधर्म व परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक, निष्काम कर्मयोगी भारताचे आदर्श महामानव, थोर समाज सुधारक "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांचा दरवर्षी ३ एप्रिल ला जन्मोत्सव निमित्त परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर च्या वतीने टिमकीतुन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ ( मानव मंदिर ) पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येते. आणि मानवधर्मावर आधारित चर्चा सत्र आयोजित करण्यात येते. या शोभायात्रेत लाखोंच्या संख्येने सेवक-सेविका गावोगावुन, शहरातुन, राज्यातुन येऊन शोभायात्रेत सहभागी होतात. व चर्चासत्रेचा लाभ घेतात. अशा प्रकारे "महानत्यागी बाबा जुमदेवजींचा" जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने या महामानवाला कोटी कोटी प्रणाम!


। भगवान बाबा हनुमानजी की जय।

।। महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय ।।

।।। परमात्मा एक ।।।

सत्य, मर्यादा व प्रेम कायम करनेवाले 

अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले

 मानव धर्म की जय ।   


माझ्या लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.


नमस्कार....!


( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )


सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार 

                   ( Social Media Platform)



🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎


             ★ सेवक एकता परिवार ★

             ( Social Media Platform )


©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )

https://www.facebook.com/SevakEktaParivar/



©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )

https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1


©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )

https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q


©️ सेवक एकता परिवार ( Instagram )

https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/

Saturday, March 27, 2021

परमात्मा एक मानवधर्मातील सेवकांनी होळी कशाप्रकारे साजरी करावी. यावर विशेष माहिती

         "मानवधर्म" व "होळी"

परमात्मा एक मानवधर्मातील सेवकांनी होळी सण कशाप्रकारे साजरा करावा यावर विशेष माहिती नक्की वाचा.



            परमात्मा एक मानवधर्मातील सेवकांनी 
                होळी कशाप्रकारे साजरी करावी.
                        यावर विशेष माहिती

       आपण मार्गात प्रवेश करतेवेळी परमेश्वराला वचन दिले आहे."भगवान बाबा हनुमानजी मी जिवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. मी मरिन किंवा जगीन जीवनात एकच परमेश्वराला मानीन" परमेश्वराला दिलेल्या या वचनानुसार आपल्याला मानवधर्मात कुठलाही सण नाही. पण हिंदू धर्म संस्कृतीत राहून समाजात असतांना आपण हिंदू धर्मातील सण आपण आपल्या मानव धर्माच्या नियमात राहून साजरा करू शकतो. ज्याप्रमाणे आपण मानव धर्मातील सेवक दसरा, दिवाळी सण साजरा करतो त्याच प्रमाणे होळी सण सुद्धा आपल्या मानव धर्मातील नियमात राहून साजरा करू शकतो. 

      होळी हा सण आपल्या देशात खुप उत्साहाने साजरा करतात. आपण सुद्धा एकमेकांना रंग लावून होळी या सणाचा आनंद घेत असतो. पण आपल्याला या मानवधर्मा मध्ये दारू आणि दारू पिणाऱ्या व्यक्ती पासुन दूर राहायचे आहे. आणि हा सण पण साजरा करायचा आहे .

     आपण होळी हा सण साजरा करत असतांना रंग 🎨 व पाण्याचा 💧 जास्त प्रमाणात उपयोग करतो. त्यामुळे आपल्याला काहीच फायदा होत नाही. उलट नुकसानच होते. आपण या आधीच्या होळीला पाहिले आहे रंगामुळे आपली स्कीन खराब होते. आणि पाण्याचा दुरुपयोग होते. याच पाण्याची बचत आज केली तर येणारा उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही. म्हणून आपण मानव धर्माचे सेवक जर समाजाला एक प्रेरणा देऊ शकेल याप्रकारे होळी सण साजरा करू शकतो व पाण्याच्या दुरुपयोग टाळू शकतो .

      आपण होळी खेळत असतांना आरडाओरड किंवा डीजे लावून ध्वनीप्रदूषण करत असतो. याच दिवसात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असतात. यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रीत होऊन याकडे आकर्षित होतात. व त्यांचा परिक्षेच्या अभ्यासावर परिणाम होतात. यामुळे त्यांना परिक्षेत कमी गुण मिळाल्याने त्यांचे समोरच भविष्य खराब होतो. म्हणून आपण सेवकांनी जर साध्यासुध्या व शांततेने होळी खेळली तर त्यांचा भविष्यात आपणच काही प्रमाणात प्रेरणादायी बनू शकतो .

         आपल्या मानव धर्मातील सेवकांनी आपल्या परिसरातील, गावातील सेवकांचा घरी जाऊन त्यांना गुलाल लावून होळी सणाच्या शुभेच्छा देऊन होळी हा सण त्यांच्या सोबत साजरा करू शकतो. त्यामुळे ते सेवक सुद्धा अनेकांचा दुर राहतील आणि आपण सुद्धा जवळपास दोन-चार घराचे सेवक असतील तर आपण त्यांच्याशी मानव धर्मावर संवाद साधू शकतो. आणि होळी या सणाचा आनंद ही घेऊ शकतो. 

       आपल्या परिसरात किंवा गावात एक किंवा दोनच घराचे सेवक असतात. आणि आपण अनेका सोबत होळी साजरी करतो म्हटले. तर त्या दिवशी दारू पिणारे असतात. आणि आपल्या दारू पिणाऱ्या पासुन दुर राहायचे आहे. म्हणून सेवकांनी आपल्या जवळच्या सेवकां सोबत होळी साजरी करावी. आणि सेविका ताईंनी सुद्धा आपल्या परिसरातील सेविका ताई सोबत होळी या सणाचा आनंद घ्यावा .

       माझ्या मते होळी या सणाचा दिवशी आपण सेवक आपल्या परिसरातील सेवकांसोबत मिळून मिसळून होळी हा सण साजरा करू शकतो. आणि आपण सर्व एकाच मानव धर्माचे सेवक आहोत तर या होळीच्या दिवशी आपण एकत्र येऊन नविन सेवकांशी ओळख होते. आणि एका भगवंताची चर्चा बैठक घेऊन त्यानंतर एकमेकांना गुलाल लावून अल्पोहार घेऊन एकमेकांना शुभेच्छा देऊ शकतो. आणि होळी हा सण आपण सेवकां सोबत साजरा करू शकतो. कारण माझ्या माहितीप्रमाणे असे भरपूर ठिकाणी होतात. म्हणून आपण सर्वांनी पर्यावरण पूरक व कोरडी होळी साजरी करावी असे मला वाटते .

नमस्कार....!

( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )

सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार 
                   ( Social Media Platform)


🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎

             ★ सेवक एकता परिवार ★
             ( Social Media Platform )

©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )
https://www.facebook.com/SevakEktaParivar/


©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )
https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1

©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q

©️ सेवक एकता परिवार ( Instagram )
https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/

Saturday, March 20, 2021

बाबांनी भगवत गुणांचे तीन शब्द दिले आहे. | ३) "प्रेमाने वागने" यावरिल विचार नक्की वाचा व आवडल्यास शेअर करा.

 



  ( बाबांनी भगवत गुणांचे तीन शब्द दिले आहे. )

             [ ३) "प्रेमाने वागने" ]

         बाबांनी भगवंत गुणांचे तीन शब्द दिले आहेत त्यातील तिसरा शब्द प्रेम आहे. प्रेम हा शब्दच ऐकता मन प्रफुल्लित होतो. आपल्या कुटुंबात व सेवकात प्रेमाची वागणूक असावी. आपल्या परिवारात एकमेकांवर ज्या प्रमाने प्रेम असते. त्याचप्रमाणे भगवंताचे कार्य एकतेने प्रेमाने करावे. प्रेम हा  भगवंताला आवडणारा गुण आहे.


        आपल्या कुटुंबात असो किंवा सेवकात आपले शब्द नेहमी प्रेमाचे असावे. कोणी कितीही रागावले तरी चालेल. पण आपण प्रेमानेच बोलावे. प्रेमाने कुणाचेही मन जिंकता येते. एक जुनी म्हण आहे. "ढाई अक्षर प्रेम का, पढे सो पंडित होय." भगवंता विषयी प्रेम ठेवा. भगवंत सर्वच देतो.


        प्रेम दिल्याने प्रेम मिळेल. बाबांनी प्रत्येक आत्म्यात परमेश्वर दाखविला आहे. आणि प्रत्येक आत्म्याचा आदर ठेवून आपले शब्द बोलायला पाहिजे. प्रत्येक शब्द हा प्रेमाने बोलावा. आपल्या शब्दाने दुसर्या आत्म्याचा अनादर होऊ नये. दुसर्या आत्म्याचा अनादर केल्यास त्याचा नव्हे तर परमेश्वराचा अनादर होतो. कारण आपली आत्मा ही परमात्मा एक अंश आहे. त्याकरिता कोणाचाही अपमान होणार नाही याची काळजी घेऊन आपले शब्द प्रेमानी वापरावे. बाबा कधीही कुणावर रागावले नाही. सर्वांशी प्रेमाने संवाद साधायचे. बाबांचा शिकवणीप्रमाणे आपल्याला पण प्रेमानेच वागायचे आहे. प्रेमाने बोलायचे आहे.


         प्रेमाची परिभाषा वेगळीच असते. आपल्या परिवारात, आपल्या कामात, व्यवहारात प्रेमाची वागणूक ठेवली की, मोठ्यात मोठा शत्रु सुद्धा बदलतो.   प्रेमाने मन जिंकता येते. पण हेच प्रेम स्वार्थी झाले तर प्रेमाने आपली फसवणूक पण करतात. म्हणून हुशार पण राहने तेवढेच महत्त्वाचे आहे. आपले कर्म प्रेमाने आणि मर्यादित केले तर परमेश्वर आपले कधी ही वाईट होऊ देणार नाही. परमेश्वराला आवडणारे गुण सत्य, मर्यादा व प्रेम आपल्या अंगी असले तर परमेश्वर आपल्याला कुठेही काहीही कमी पडू देणार नाही. 


माझ्या लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर मी "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.


नमस्कार...!


( टिप:- ही पोस्ट कुणीही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावे. )


सोशल मीडिया प्रकाशन :- सेवक एकता परिवार 

                   ( Social Media Platform)



🌎 आम्हाला खालील सोशल मीडिया वर नक्की भेट द्या.🌎


             ★ सेवक एकता परिवार ★

             ( Social Media Platform )


©️ सेवक एकता परिवार ( Facebook Page )

https://www.facebook.com/SevakEktaParivar/



©️ सेवक एकता परिवार ( BlogSpot )

https://sevakektaparivar.blogspot.com/?m=1


©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )

https://www.youtube.com/channel/UCj4StIiPevldlO38UEcdE9Q


©️ सेवक एकता परिवार ( Instagram )

https://www.instagram.com/sevak_ekta_parivar/

परमात्मा एक मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.

  "परमात्मा एक" मानवधर्मात सेवकांनी दसरा सण कशाप्रकारे साजरा करावा.         !! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!       !! महानत्याग...